Thursday, 18 June 2020



नमस्कार
 
मी मारुती शेरकर.
 
मुंबई महानगरपालिका संचालित सायन मनपा माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे.
 
आपल्या क्रमिक पुस्तकांमधील राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि संविधानाची उद्देशिका केवळ त्या कागदावरच राहिली आहे. रोजच्या परिपाठात त्यांचं केवळ यांत्रिक उच्चारण केलं जातं. कागदावरचे हे शब्द खरंतर ही मूल्ये जर संस्कारक्षम काळजांवर उमटतील तर आणि तरच विविधतेनं नटलेल्या या देशाची एकता अभंग राहिल. इथलं एकत्व, भारतीयत्व टिकून राहिल. आम्ही यथाशक्ती आमची शाळा संविधान साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहोत. उद्देशिकेतील सांविधानिक मूल्यांची किमान तोंडओळख आमच्या मुलांना झालेली आहे. परिपाठाद्वारे, वेगवेगळ्या स्पर्धांद्वारे संविधानाधारित लोकशाहीची बाराखडी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या त्या बालमनांवर रुजवता येणं शक्य आहे. त्यायोगे शाळा संविधान साक्षर होऊ शकते. सुजाण नागरिकत्त्वाची मुळाक्षरे इथूनच आपल्याला गिरवावी लागतील. त्यासाठी शिक्षकांना संविधान साक्षरतेचे प्रशिक्षण द्यावे लागेल. संविधानातील कलमे, अनुच्छेद, अधिकार, कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे ह्यांचा अभ्यास यथावकाश करता येईल. एलएलबीच्या अभ्यासक्रमात भारतीय संविधान हा एक विषय आहे. परंतु सर्वचजण कायदेपंडीत होत नाहीत. प्रत्येक भारतीय नागरिकाला भारतीयत्वाची आणि नागरिकत्वाची किमान पात्रता कळणे अत्यंत गरजेचं आहे. इयत्ता बारावीचा विद्यार्थी नागरिकत्त्वाच्या उंबरठ्यावर उभा असतो. या देशाचा तो नवमतदार बनणार असतो. या नव्या युगाच्या शिलेदाराच्या हाती या नवभारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे. म्हणून इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमात संविधान आणि किमान त्यातील मूल्यांवर आधारित ५० मार्कांचा एक पेपर असावा.
 
केवळ लिहिता वाचता येण्याने औपचारिक साक्षरता येऊ शकते. पण सुसंस्कृतपणा येण्यासाठी, माणुसकी रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक काही संस्कार करावे लागतील. शिक्षणातून चांगले परिक्षार्थी बनून ऐहिक सुखाचे लाभार्थी बनता येईल पण इतरांविषयी आपुलकी, कणव, तळमळ, कळकळ, सेवा, प्रेम, करूणा ऑनलाईन डाऊनलोड करता येत नाही. माणुसकीची आच लागल्याशिवाय या सो कॉल्ड डिग्री होल्डरला सर्वार्थाने 'माणूस' म्हणता येणार नाही. त्याचे शिक्षण झाले असेही म्हणता येणार नाही.
 
आत्मभान, समाजभान, जग जगणं, आपलं भवताल, हे राज्यसकट कसं चालवलं जातं. ह्याचं मुलभूत ज्ञान ह्या सांविधानिक मूल्यांद्वारा मिळू शकतं. एक मत एक मूल्य असा मतदानाचा अधिकार संविधानाने आपल्याला बहाल केलेला आहे. परंतु स्वातंत्र्य मिळून ७० वर्षानंतरही इथला मतदार राजा ह्या लोकशाहीचा लाभार्थी कधीकधी आपलं अमूल्य मत विकताना दिसतो. हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. व्यक्तीला मत असावं, त्याला भूमिका घेता यावी, त्यावर ठाम राहता यावं. तसेच लोकशाहीत विरोधी मतांचा आदर करण्याची सहिष्णू वृत्ती असावी हे सारे आदर्श प्रत्यक्षात साकारण्यासाठी संविधानाचे धडे बालवयातच देणे आवश्यक आहे.
 
माणसाला माणूस म्हणून आत्मसन्मानाने जगायला शिकवणारा जीवनग्रंथ म्हणजे संविधान.
भारतीय नागरिकाच्या सर्वांगिण मुक्तीचा लिखित ग्रंथ म्हणजे संविधान.
लाखो करोडो भारतीयांच्या आशा आकांक्षाचे प्रतीक आणि स्फुर्तिस्थान म्हणजे आपले संविधान.
सामाजिक विषमतेने गांजलेल्या या देशवासियांमध्ये समताधिष्टित समाजनिर्मितीचा हुंकार म्हणजे संविधान.
प्रगतिक विज्ञाननिष्ठ व विवेकशील समाज उभारण्याची सामुहिक प्रतिज्ञा, सामुहिक निर्धार म्हणजे संविधान.
एकूणच काय तर आपल्या अस्तित्वाचे विधान म्हणजे आपले संविधान. 
 
अशा भारतीय संविधानाचा विचार कुठून युरोप, अमेरिकेतून आलेला नाही. ह्या जमिनीतच ते निपजलेले आहे. इथला बळीराजा, गौतम बुद्ध, महावीर, गुरुनानक, कबीर, तुकोबा, ज्ञानोबा, छत्रपती शिवराय ह्या सर्वांची महान अशी विचार परंपरा संविधानाच्या प्रत्येक कलमामध्ये, अनुच्छेदामध्ये पानोपानी आपल्याला जाणवते. भारतभूमीतल्या संतांचं, पंथांचं, महामानवांच्या विचारांचं प्रतिबिंब आपल्या संविधानात कसे उमटले आहे ह्याची मीमांसा करत, विवेचन करत, लोकशाहीर संभाजी भगत राष्ट्र सेवा दलाचे अल्लाउद्दीन शेख यांच्याशी चर्चा करत मिशन माणुसकीच्या वतीने 'भारतीयत्वाची abcd' ही छोटीशी पुस्तिका मी लिहिली आहे. सन्माननीय आमदार कपिल पाटील यांच्या प्रेरणेने ही पुस्तिका तत्कालीन शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. उद्देशिकेतील शब्दाशब्दाचा नव्हे तर प्रत्येक मूल्याचा सहज आणि सुलभ अन्वयार्थ लावण्याचा मी त्याद्वारे प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना नक्कीच ही पुस्तिका उपयुक्त ठरेल.
 
संविधान निर्मितीची प्रक्रिया :
शेकडो बॅरिस्टर्स, त्यांची प्रदीर्घ चर्चा, त्यांच्यातल्या मतभेदांचं सौंदर्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं अतुलनीय योगदान, इ..
 
जात, धर्म, भाषा, वंश, प्रांत या भेदांपालिकडे जाऊन आपण भारतीय व्हावं, एनलायटेड म्हणजे प्रबुद्ध आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी, आपल्या प्रजासत्ताक संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी आपल्यासमोर संविधानाशिवाय दुसरा पर्याय नाही.
 
फुले शाहू आंबेडकर आणि प्रबोधनकारांच्या स्वप्नांचा अर्क असलेलं संविधान मनामनात रुजवण्यासाठी दोन मागण्याः
 
१) शिक्षकांना संविधान साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावं.
२) इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमात संविधान आणि किमान त्यातील मूल्यांवर आधारित ५० मार्कांचा एक पेपर असावा..
 
संविधान प्रचारक आणि मिशन माणुसकीच्या संयुक्त विद्यमाने संविधानाच्या उद्देशिकेतील प्रत्येक मूल्यावर संविधान अभ्यासकांची आत्तापर्यंत पंधरा व्याख्याने झालेली आहेत. नामवंत साहित्यिक कवी विचारवंत आणि समाजकारणातील धुरीणांचे यासंदर्भातले व्हिडिओज आपण शेअर करत आहोत. याबाबतीतला आजचा पहिला व्हिडिओ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांचा आहे. तुम्ही हे सारे व्हिडिओज ऐकावेत. आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.  काळाची गरज असलेल्या या अभियानामध्ये सक्रिय सहभागी व्हावे. ही आपणास नम्र विनंती. धन्यवाद..

 व्हिडिओ : https://youtu.be/mF4DKQSkmDw

 
मारुती शेरकर.


Saturday, 6 June 2020

संविधान संवर्धन आणि साक्षरता अभियानांतर्गत कार्यशाळा मार्गदर्शन

२१ ऑक्टोबर २०१८

मी मारुती शेरकर,
मु. तराळवाडी,
ता. पारनेर,
जि. अहमदनगर.

मी हे अशासाठी सांगतो की हा मारुती शेरकर हे प्रातिनिधीक स्वरूप आहे. तुम्ही पण एक मारुती शेरकर आहात. तुमचंही असंच एक कुठलंतरी गाव आहे. कुठल्यातरी कानाकोपऱ्यातून आपण सगळीजण इथं आलेलो आहोत. व्यवस्थिरित्या आब आणि रुबाब ठेवून मी तुमच्यासमोर उभा आहे. हा जो प्रवास आहे तो अतिशय विस्मयकारी आहे. ज्या आईवडिलांनी जन्म दिला ते ठार निरक्षर होते. पण ते माझं विद्यापीठ आहे. कारण त्यांनी मला किंवा आपल्या सर्वांना दिलेली शिकवण. त्यानंतर या पुरोगामी महाराष्ट्रातले जे महामानव आहेत. ज्यांनी आपल्या योगदानातून ह्या महाराष्ट्राला एक आगळीवेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. ते ही आपले आईबाबा आहेत. तेही आपले पालक आहेत. त्यांनी आपल्याला सर्वांना इथपर्यंत आणलेलं आहे. पण आजही आपले लाखो बांधव-भगिनी वंचित आहेत. त्यांना या संविधानाचे ते फायदे किंवा फळं मिळालेली नाहीत. ते आजही या लोकशाहीचे लाभार्थी नाहीत. लोकशाहीचे लाभार्थी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. म्हणून ही जी लोकशाही आहे त्याचा जो मुलभूत गाभा आहे तो म्हणजे आपले संविधान. ती सांविधानिक मुल्ये काय आहेत याचा विसर पडून कसा चालेलआपल्याला त्या संविधानिक मूल्यांचा आधी अभ्यास आणि नंतर अंगीकार करून आपल्याला अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तन घडवून आणायचे आहे. त्यासाठीच तर हे अभ्यास शिबिर आयोजित केलेले आहे..

एक अमेरिकन इतिहासकार हॅले नावाचे गृहस्थत्यांनी असं म्हटलंय की, “Coming together is beginning, keeping together is progress & working together is success.” हे जे successively success आहे हे केवळ आपल्या एकत्र येण्यातून होणार आहे. कारण ते एकत्वते भारतीयत्व काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपला जो एक certain comfort zone आहे. comfort zone म्हणजे की एक नाईन टू फाइव जॉब असतो. हॅन्ड टू माऊथ आपलं सगळं मॉर्निंग आणि स्पेंडींग सगळं आलबेल चाललेलं आहे. मग हे जे काही वेड आहेअसं म्हणतात It is wise to be mad for some purpose या जगाला शहाणं जर कोणी केलं असेल नातर ते ह्या वेड्या लोकांनीच. एक certain madness त्यांच्याकडे होता. certain insight त्यांच्याकडे होती. sight सगळ्यांकडं आहे what about insight?. एक Mindset त्यांच्याकडे होतं. एक dream होतं आणि ती एक ideology होती. ते स्वप्नंत्याची फळं चाखायला किंवा ते बघायलाही ते नाहीत. पण त्यांनी हे जे काही वेड होतं. म्हणजे तुकोबा असतीलशिवबा असतीलफुले-आंबेडकरशाहू महाराज असतील. त्या त्या लोकांनी त्या त्या काळात बघितलेलं ते एक वेड होतं. मग संविधान म्हणजे नेमकं कायतर या सगळ्या आशा आकांक्षाचा अर्क आहेनवनीत आहे. आपल्या सगळ्यांच्या स्वप्नांचं ते प्रतिक आहे. त्यामुळे हे जे काही आपण आज या सभागृहामध्ये छानअगदी सुटबुट जरी नसला तरी ज्याला आपण एक living standard म्हणतो ते आपण maintain करत आहोत. म्हणून आपल्याला हे social किंवा थोडीशी आपली commitment to society, pay back to society. म्हणजे आपण ऋणात असणं. कशाकशाच्या ऋणात असायला हवंअसं आहे की, gratitude is a memory of heart आपल्या हृदयाची आपल्या काळजाची ती भाषा असते. Thanks म्हणणं. मग तो निसर्ग असेलआपली जडणघडण करणारा.

हे संविधान समजून घेण्यापूर्वी आपल्याला काही ज्या मूलभूत गोष्टी आहेत ज्याला आपण समाजभान म्हणतो. समाजभान येण्यासाठी आधी आत्मभान यावं लागतं. आपण सगळे भानावर आहोत म्हणून इथं पोहोचलो आहोत. भान येणंहे आत्मभान म्हणजे कायते आत्मभान येण्यासाठी आधी आपल्याला आत्मसन्मान, self respect की जसं संविधानामध्ये dignity of an individuality म्हटलेलं आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा. पण तत्पूर्वी मला मी स्वतः प्रतिष्ठीत समजतोय का? Education gives us knowledge, knowledge gives us confidence & confidence gives us respect या वाटेवर मी आहे काफुल्यांनी जे म्हटलं कीत्या एका अविद्येने सर्व अनर्थ केलेले आहेत. बलुतंकार दया पवार कोंडवाडा कवितेत असं म्हणतात, “असतो नर्मदेचा गोटा तर असल्या इंगळ्या डसल्या नसत्या.” मला माणूसपणाची जाणीव झाली. म्हणजे मला आत्मभान आलं. आत्मसन्मान मिळाला आणि मग मी गावकुसाबाहेर का आहेकिंवा मी का वंचित आहेमी या इंडियामध्ये कधी प्रवेश करता होणार आहेज्या १% लोकांकडे जवळपास ७०% संपत्ती आहे. या भारताच्या स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर. तर मी या भारतातला एक शेवटचा किंवा सामान्य किंवा असा एक फाटका माणूस का आहेआपण तिथून आलेलो आहोत. आपली पहिली पिढी आहेगाव सोडून आपण जगायला आणि चांगलं जगायला. चांगला माणूस अधिक समृद्ध प्रबुद्ध माणूस म्हणून माणसात आलो. तर हा कोणता प्रवास आहेकुठून आणि कसा हा प्रवास सुरु झालातर आपल्याला कुठंतरी जागं व्हायचं आहे. आपल्याला भानावर यायचं आहे. म्हणून हा सगळा खटाटोप आहे. कारण आपण बघतो की एक आत्मस्तुती किंवा आत्मसमर्थनसेल्फ जस्टीफिकेशनमी कसा बरोबर आहे आणि मग नंतर आत्मरंजन म्हणजे स्वतःला खूष ठेवणं. मग त्यातून कुठेतरी एक फॉल्स इमेज तयार होते. त्या फॉल्स इमेजमध्ये आपलं आयुष्य पुढे पुढे जात राहातं. म्हणजे मी फेडरेशनचा चेअरमन आहेमी डायरेक्टर आहेमी मी मी.. त्या मीपणातून मी खराखुरा कोण आहेहे जगहे जगणं हे समजून घेण्यासाठी आपल्याला सांविधानिक मूल्ये जर चांगली लक्षात आली तर नक्कीच आपल्या जीवनाला एक वेगळा अर्थ प्राप्त होईल.

संविधानाकडे जाण्यापूर्वी आणखी एक गोष्ट मी तुम्हाला पालकत्वाची सांगत होतो. जे महापुरुष आहेत. म्हणजे देव आपल्या श्रद्धा देतात. संविधानामध्ये उपासनेचं स्वातंत्र्य आहे. त्याहीपेक्षा जेव्हा प्रेरणाम्हणजे certain belief विश्वास ह्या सगळ्या गोष्टी संविधानाने आपल्याला बहाल केलेल्या आहेत. मला कोणतंही विवादात्मक विधान करायचं नाही. पण जेव्हा आपल्या आजूबाजूला काय घडतंयजेव्हा समाजभान या विषयावर आपण बोलतोय तेव्हा उल्लेख केलाच पाहिजे. शबरीमाला मंदिरामध्ये आजही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सलग आठ दिवस तिथं संचारबंदी आहे. आपल्या आयाबहिणी आणि लेकीबाळी नाही जाऊ शकत तिथे. १० ते ५० वयोगटातील या रजस्वल महिलांना इथल्या महिलांनीच अडवलंय. म्हणजे मासिक पाळी अपवित्र आहे हे महिला सांगतायत. म्हणजे त्यांना आत्मसन्मान नाहीए. त्यांना त्यांची ओळख नाही स्वतःचीत्या स्त्रीत्वाची. म्हणून या घटना घडत आहेत. परवा पिंपरी चिंचवडला दसऱ्याच्या आदल्या दिवशी ऐश्वर्या नावाची कांजारभाट समाजातली ती मुलगी नवरात्रात माहेरी आली होती. त्या तेविस वर्षाच्या मुलीने जे काही वर्षा दोन वषापूर्वी लग्न केलंकोर्ट मॅरेज केलं. तेव्हा तिथं योनिसूचिता आणि कौमार्यभंग असे विषय निर्माण झाले. कौमार्य चाचणीला तिने विरोध केला. म्हणून त्या जातपंचायतीने तिला बहिष्कृत केलं. ती परवा माहेरी आली. चालली गरब्याला गेली तिथे. तिथल्या लोकांनी गरबाच बंद करून टाकला. कारण ती बाहेर जात नव्हती. शेवटी ती पोलीस ठाण्यात गेली. म्हणजे सांविधानिक मूल्ये काय आहेतस्त्री-पुरुष समानता म्हणजे काय? equality म्हणजे कायजर आपण संविधानातली ही जी काही मूल्ये आहेत ती जर आपण बघायची म्हटलं तर आपल्याला हे भान येणं फार आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला काय घडत आहेमाझ्या मनामध्ये काय गोंधळ आहे कासंभ्रमावस्था आहे कामघाशी मी माझ्या मित्रासोबत बोलत असताना म्हटलंसॉक्रेटीस एक म्हणायचा की, “I know.. that I don’t know..” हे जग म्हणजे आपल्याला.. मूळात कळतं केव्हाकी आपल्याला ठार कळत नाही हे तरी कळलं पाहिजे नाकाय आहे जगजेव्हा कळत नाही हे आपल्याला कळतं आणि तिथून आपल्याला कळायला सुरूवात होते. आपल्याला खूप समस्या आल्या म्हणजे आपल्या मनामध्ये अनेक समस्याअनेक कुतूहल असली पाहिजेत. म्हणून इथं बाबासाहेबांनी जसं म्हटलंय की या जगात दोनच जाती आहेत. एक स्त्री आणि दुसरा पुरुष आणि एकच धर्म आहे तो म्हणजे मानवता. हे काम आपल्याला पुढं न्यायचंय. तर हे आपल्या आजूबाजूला जे काही घडतं आहे आणि मग याच्या मूळाशी जर आपण गेलो तर या महापुरुषांनी आपल्याला जे काय पुरोगामीत्त्व बहाल केलेलं आहे. मग ते ज्ञानोबा तुकोबा असतीलकबीर असतील , चार्वाक असतील ह्या सगळ्या लोकांनी त्या काळात बघितलेल्या स्वप्नांचं हे प्रतीक आहे किंवा आरसा आहे असं समजूया. आता ते हवे होते हे सगळं बघायला. मग एक कडाडती वीज किंवा कळसाध्याय जो बाबासाहेबांच्या रुपानं जे मनाला माणुसकीकडं घेऊन जाणारंशरीराला श्रमाकडं घेऊन जाणारंबुद्धीला सत्याकडं नेणारं अशी जी काही विचार प्रक्रिया.. thought process त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. म्हणजे मूलभूत संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. आपलं जगण्याचं सार त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून संविधान या masses पर्यंत.. आता हे masses म्हणजे कायतर आपण बघतो झेंड्यांचे कलर्स वेगवेगळे आहेत. कुणाच्या हातात आणखी काय दगड पण असू शकतो. कोणाच्या खांद्यावर कायआपल्या महाराष्ट्राचे अजून एक living legend आहेत डॉ. आ. ह. साळुंखे. ते म्हणतात तुमच्या खांद्यावर तुमचंच डोकं आहे कायम्हणजे आपल्या खांद्यावर डोकं कुणाचं आहे हा प्रश्न पडतो. मग कुठेतरी ही शिक्षण व्यवस्था नापास झालेली आहे कायआपल्याला घडवणारी ही संस्कृती नापास झालेली आहे कायआपण कुठे आहोततर हे जे masses आहेत ना त्यांना many asses असं म्हटलं जातं. त्यांना कसं divert करायचंकुठं न्यायचंकाय असतं.. एक नेतृत्त्व असतं. ते एक वेडेपण असतं. त्यांना ते स्वप्नं पडलेलं असतं. मग ते जर विधायक असेलरचनात्मक असेल जसं संविधान आहे. संविधान ही संरचना आपलं जगणं आपल्या समोर मांडतं.. जसं महात्मा गांधी असं म्हणायचेकी तुमचे हेतू शुद्ध असावेत आणि हेतू साध्यतेचे मार्गही तितकेच शुद्ध असावेत. म्हणजे my life is my message म्हणजे इतकं त्यांचं.. सत्याचे प्रयोग किंवा सत्य आणि अहिंसा ती तत्वे जगप्रसिद्ध आहेत. आइन्सटाईन असं म्हणायचेजगामध्ये असा गांधी नावाचा माणूस होऊन गेला असेल यावर पुढच्या पन्नास वर्षांनंतरची पिढी विश्वाससुद्धा ठेवणार नाही. तर हे जे काही वेगवेगळ्या धारेची विचारधारेचे लोक आहेत ज्यांना आपण masses म्हणतो हे raw material आहे. आपल्याला त्याला कुठेतरी एका organizational पातळीवर.. मग त्याच्या काही ideologies आहेत. आपल्याला त्या विषयावर आज बोलायचं नाही. पुन्हा केव्हा तरी त्या विषयावर बोलू आपण. म्हणजे जे काही प्रोग्रॅमपॉलिसीजडिसीप्लीनलिडरशीपअॅक्टीव्हीस्ट या विषयावर आपण नंतर बोलू.

आज आपल्याला या सांविधानिक मूल्ये किंवा ज्या तरतूदी आहेत. कारण आपण सर्वजन या लोकशाहीचे लाभार्थी आहोत. ही Democracy is not an object but it is an instrument, it’s a tool to achieve our objectives. हे कोणते objectives आपल्याला achieve करायचे आहेतआपण सारे भारतीय आहोत. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा प्रत्येकाने म्हणजे.. आपण कधीतरी शाळेत गेलो तेव्हा सुद्धा ती प्रतिज्ञा होती. अलिकडे प्रतिज्ञेनंतर सरनाम्याची त्यात भर टाकलेली आहे. मग हा संविधानाचा जो सरनामा आहेउद्देशिका आहेप्रस्ताविका आहे. म्हणजे तो ट्रेलर आहे. सिनेमा पुढे आहे. म्हणजे आपल्याला कलमं सगळी अभ्यासालीच पाहिजे असे नाही तर ते गरजेनुसार आपण नंतर बघू किंवा ते वैयक्तिक पातळीवर आपल्याला करता येईल. एकदा संविधान का जाणून घ्यायचंका अभ्यासायचंहे एकदा कळलं की ते काम कसं करायचं हा मुद्दा गौण ठरतो. That is methodology. I am talking about some ideology एक mindset. आपल्याला हे का करायचं आहेते जाणून घ्यायचं आहे. मग हा जो भारत विरुद्ध इंडिया. हा स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर भारत विरुद्ध इंडिया आणि ही जी विषमता आहे. सगळ्या बाबतीतली ती जर मिटत नाही. म्हणजे बाबासाहेब तेव्हा संविधान सुपूर्द करताना म्हटले होतेप्रचंड विसंगती आहे इथे आणि या विसंगतीपूर्ण अवस्थेत हे संविधान आपण आपल्यालाच अर्पण करत आहोत. We the people of India म्हणजे आम्ही भारतीय लोक. हे कोणा ईश्वराला किंवा आणखी एखाद्या राष्ट्रपित्याला पण ते अर्पण केलेले नाही. आम्ही भारतीय लोक. आम्ही भारतीय लोक म्हणजे कायतर आपल्याला ती जी ओळख होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. संविधान देशाला देशाप्रती ते अर्पण करत असताना तेव्हा त्यांनी म्हटलं होतं कीविसंगती आहे. Full of contrast आहे. म्हणजे एक विशिष्ट जात काहीतरी गू-घाण डोक्यावर घेऊन मैला वाहते आहे. दुसरे लोक कुठेतरी मॅजिस्ट्रेट आहेत. तर त्याच्या ह्या श्रमाला प्रतिष्ठा काय आहेकाय आहे हेकसली विषमता आहेजर वंचितांना न्याय मिळत नसेल तर कदाचित ते हे संविधान अमान्य करतील. मी जर जिवंत असेल तर मी त्या वंचितांच्या बाजूने असेल. असं डॉ.बाबासाहेब म्हटलेले आहेत. म्हणजे ते संविधान यशस्वी करायचं की नाही हे या सर्व आम्हा भारतीयांवर अवलंबून आहे.

मग या लोकशाहीच्या संदर्भात.. जसं अथेंसमध्ये सॉक्रेटीसने सांगितलं की दोनच जाती होत्या एक गुलाम आणि दुसरा मालक. आपल्याकडेही शेकडो राजे होते आणि राजेशाही होती. सरंजामशाही होती. आजही ती सनातनी वृत्ती आपल्याकडे बर्‍याचजणांच्या डोक्यात आहे. म्हणजे कुठल्यातरी सो कॉल्ड उच्च वर्णात जन्माला आले म्हणून ती सनातनी वृत्ती येते असं नाही. जेव्हा एक ऐहिक सुखंपैसा किंवा इतर काही भौतिक गोष्टी आपल्या पायाशी लोळण घेतात तेव्हा आपण अचानक उडी मारतो वरच्या वर्गामध्येवरच्या वर्णामध्ये. म्हणजे इथं कुठल्या जातीलाधर्माला आपल्याला काही नावं ठेवायची नाहीत. ही बिरादरी पैसे असणारांची म्हणजे श्रीमंतांची आणि दुसरीकडे गरिबांची. तर हा जो काही भेद आहे त्या भेदावर आपल्याला काम करायचंय.

बोलत होतो लोकशाहीवर. जे लिंकनने म्हटलं, For the people, by the people अशी जी काही system आहे. आता हे buy the people असं म्हणायची वेळ आलीय. आजही पुन्हा एकदा आपण असं म्हणूया की एवढ्या वर्षानंतर मतं जर विकली जात असतील. म्हणजे ज्या संविधानानं आपल्याला एक मत एक मूल्य दिलंय. ते मत अक्षरशः विकलं जातं. ठार आडाणी लोक त्यांचं एकवेळ आपण समजू शकतो. त्यांना काय साडी दिलीचोळी दिलीधोतर दिलं. जगण्यासाठी त्यांना ती गरज आहे. त्यांच्या पोटाची गरज आहे. पण जेव्हा शिकलेली लोक.. म्हणून मी म्हटलं शिक्षण व्यवस्था नापास झालेली आहे कायशिकलेली माणसं जर आपलं मत विकत असतीलमत विकणं म्हणजे आत्मा विकणं. स्वतःचं आत्मभान विसरणं. मी विकायला काढलंय स्वतःला. अशी जी काही अवस्था.. मग मला मत नाही. मत म्हणजे opinion.. मला काय वाटतं? What do you mean? What is my opinion? What according to you? मला काहीच वाटत नाहीकुठंतरी आपण अंमलबजावणीमध्ये कमी पडत आहोत.

या लोकशाहीचे आपण सारे लाभार्थी जर आहोत तर ही लोकशाही आपण समजून घेतली पाहिजे नातिचे जे काही चार स्तंभ आहेत. ते सर्वोच्च न्यायालय आहे. ज्या न्यायालयाने हस्तक्षेप केलेत अनेक ठिकाणी. कारण संविधानात तशी तरतूद आहे. जेव्हा सुरक्षान्यायसमता या गोष्टींना जर बाधा येत असेल तर सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकतं. म्हणजे त्या शबरीमाला प्रकरणामध्ये उच्च न्यायालयातील एक न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी असं म्हटलं कीनको बाबा तिथं धार्मिक काही स्वयंभू संस्था आहेत त्यात्यांच्यात आपण नाही हस्तक्षेप करायचा. एका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पण असं म्हणतात. म्हणजे जिथं स्त्री-पुरुष समतासमानता, gender equality चा विषय येतो. तर इथं ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागेल. मग मीडिया असेलमग तो इलेक्ट्रॉनिक आहे किंवा हा प्रिंट मीडिया आहे. त्यानंतर कायदेमंडळ आहे. म्हणजे संसदीय लोकशाही आपली. कायदे बनवणारी संसद आहे. हे नोकरशहांचं जे काही कार्यकारी मंडळ आहे. या सर्व सांविधानिक संस्था आहेत. मग हा जो देश आहे विविधतेनं नटलेला. या देशाचं एकत्व किंवा आपल्याला जे भारतीयत्व दिलंय. बाबासाहेब म्हणायचे की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे. कारण जेव्हा प्रादेशिक वाद निर्माण झाले. मी मराठी आहेमी आसामी आहेमी बंगाली आहे. मी भारतीय आहे.. नाही काअशा वेळेला भारतीयत्वाची म्हणून जी एक ओळख आहे. जे नागरिकत्त्व आपल्याला बहाल झालेलं आहे. कारण पूर्वी राजा होताप्रजा होती. गुलाम होते. हे सगळं संपुष्टात आलं. एका फटक्यात. संविधानाच्या एका आसूडानं एका तडाख्यानं आपण सगळे भारतीय झालो. आपण सगळे नागरिक झालो. हे जे काही मूलभूत हक्कअधिकार आपल्याला जे मिळालेले आहेत. ते जाणून घेताना हे संविधान.. त्यावेळेला जी बॅरिस्टर लोक होती. जवळपास शंभरेक लोक बॅरिस्टर होते. त्याच्यामध्ये महात्मा गांधीपंडित नेहरूसरदार पटेलडॉ. राजेंद्र प्रसादमौलाना आझाद ही सगळी बॅरिस्टर मंडळी होती. या जवळपास ९०% सवर्ण लोक होते १०% ओबीसी एससी मायनॉरिटी या लोकांचा त्यात सहभाग होता. बाबासाहेबांनांही तिथपर्यंत जाण्यासाठी खूप खटपट करावी लागली. परवा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर असं म्हटले की या देशाने दोन महापुरुषांना विसरता कामा नये. त्यामध्ये निश्चितच बाबासाहेब आहेत. पण त्यांनी महात्मा गांधींजींचं नाव घेतलं. त्याचं कारण असं आहे की घटना समितीमध्ये पंडित नेहरूंना त्यांनी सूचना केल्या होत्या. हे मसूद्याचं जे काम आहे हे बाबासाहेबांकडं द्या. कारण ही माणसं दिलदार होती. ती वाचक होती अभ्यासक होती.

एक प्रसंग सांगतो मी. जेव्हा पंडितजींना एक संदर्भ हवा होता. त्यांच्या पीएनं सांगितलं की हा संदर्भ हे पुस्तक केवळ आपल्या बाबासाहेबांकडं मिळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी राजगृह बांधलं आणि सगळ्यात जास्त म्हणजे संसदेच्या लायब्ररीमध्येही जी पुस्तके नाहीत ती त्याकाळी बाबासाहेबांकडं होती. पंडितजींनी त्यांच्या पीएला सांगितलं जा म्हणे ते पुस्तक घेऊन ये. ते पुस्तक मागण्यासाठी बाबासाहेबांकडं ते गृहस्थ आले. बाबासाहेब म्हटले कीहा मी येऊ शकेल एकवेळेस पण माझं पुस्तक नाही जाऊ शकत त्यांच्याकडे. त्यांना हवा असेल संदर्भ तर त्यांनी इथं यायचं आणि ते अभ्यासायचं. पंडित नेहरू पण तेवढेच दिलदार होते. त्यांनी व्यक्तिगत असं घेतलं नाही ते. कारण दोघेही व्यक्तीपेक्षा विचार महत्त्वाचा मानत. तिथं विभूतीपूजेला स्थान नव्हतं तर विचाराला स्थान होतं. पंडितजी स्वतः बाबासाहेबांकडे आलेचहापान झालं. हास्यविनोद झालेचर्चा झाली आणि ते निघून गेले. म्हणजे आज आपण जे राजकारणात बघतो किंवा सामाजिक जीवनामध्ये आपण मतभेदातलं सौंदर्य विसरलेलो आहोत. चर्चा करायचं सौंदर्य विसरलेलो आहोत. आपण गोळ्या घालायला लागलो. माणसं संपवायला लागलो आहे. फार प्रचंड वाईट अवस्था आहे. इथे या स्टेजवर आपल्याला पक्ष.. पक्ष म्हणजे विचार.. आपला पक्ष कोणता आहेआपला विचार कोणता आहेतर भारतीयत्व. ही संविधानाची जी काही अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी आपल्या या लाखो करोडो लोकांच्या आशा आकांक्षा ज्या आपल्या या सांविधानिक मूल्यांद्वारे व्यक्त झालेल्या आहेत. ही जी काही मूल्ये आहेत. समाजवाद. संपत्तीचं असं न्याय्य वाटप व्हावं. म्हणजे मार्क्सने जे साम्यवाद किंवा समाजातल्या कुणा एकाची उंची वाढता कामा नये. तर सर्वांची उंची थोडी थोडी का असेना वाढावी असे आग्रही मत मांडले. चीनमध्ये तो काही अंशी साम्यवाद यशस्वी झाला. रशियामध्ये हा साम्यवाद फेल गेला. कारण लोकांना त्या लोकशाहीचं.. विशेषतः भांडवलशाहीचं आणि उदारमतवादाचं जास्त आकर्षण आहे. पण कल्याणकारी राज्य ही जी संकल्पना आहे. ती या समाजाची मालकी. जे फ्रेंच राज्यक्रांतीची जी काही मुलतत्वे आहेत. १७८९ ला ज्यावेळेला व्हाल्टेयररुसोरॉबेस्पिअरमॉन्टेस्क्यू या मंडळींनी जे मूलभूत विचार दिले. आपल्या संविधानामध्ये जगातल्या सगळ्या राज्यरचना राजेशाही पासून लोकशाहीपर्यंत.. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे. तर याचा सगळ्यांचा विचार झालेला आहे. secularism ही संकल्पना नेमकी काय आहेही जी सांविधानिक मूल्ये आहेत. शाळांशाळांमधून त्या मुलांना शिक्षकांनाही त्याची जाणीव नाही. म्हणून आपल्यापर्यंत ते रुजलं नाहीजे पोहोचलं नाही. या सरकारला कोणताही धर्म नाही. म्हणजे काय आहे हेव्यक्तीला धर्म असू शकतो. कारण त्याला उपासनेचं स्वातंत्र्य आहे. मात्र सरकारला असा कोणताही धर्म नाही. सरकार कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही. सर्व धर्मीयांसाठी समान वागणूक आहे. तर मला असं वाटतं की मी आता हे जे काही मोठी मंडळी इथं आलेली आहेत. तर मी माझं बोलणं थोडं आटोपतं घेतो. आपण इथं आलात.. फक्त मला जे काही एक भान आहे. मी शबरीमालाचं उदाहरण दिलंसमाजभान म्हणत होतो. लोक व्यक्तीपूजेकडं चाललेले आहेत. विभूतीपूजा होते आहे. मत विकलं जातं आहे. असं आहे की जर व्यक्तीपूजा आणि विभूतीपूजा झाली तर आपण हुकूमशाहीकडे जातो आहोत हे ही आपल्याला संविधानकर्त्या बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे. लोक असा आक्षेप घेतात की हे संविधान अलिकडचं आहे५० वर्षांपूर्वीचं. आमचा धर्म आमची संस्कृती आमचं सारं काही फार पूर्वीचं आहे म्हणे. आमच्या घटना आमचं संविधान वेगळंच आहे. तर आपल्याला जे काही भारतीयत्वनागरिकत्वएकत्व या संविधानाने बहाल केलेलं आहे. ते आपण जपूया. ते जपण्यासाठी त्याचं संवर्धन करण्यासाठी त्याबाबत आपण स्वतः साक्षर होऊयात. ते काय आहे हे सगळं समजून घेऊया. इतर सगळ्यांना शहाणं करून सोडूया. धन्यवाद..🙏

मारुती शेरकर.